गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी, हे दिवस अगदी भुरकण उडून जातात. आम्हा गणेश भक्तांना हा वेळ पुरेसा वाटतच नाही. या काळामध्ये अगदी मेलबर्न ते पुणे, अशा जगातल्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये श्रींची स्थापना घरामध्ये होते.
असे म्हटले जाते की पेशव्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. गणपती हे पेशव्यांचे आराध्य देवत. भव्य दिव्य सजावट, लख्ख प्रकाश देणारे दिवे, आरती व प्रसाद वाटण या प्रथेची पहिले पेशवे, बालाजी विश्वनाथ यांनी पुण्यामध्ये सुरुवात केली. त्यांनी या उत्सवातून समाजात एकता आणि सद्भावना पसरवण्याचा प्रयत्न केला. पुढे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये या उत्सवाला राजकीय स्वरूप आले. श्री बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाचे सामर्थ जानून राष्ट्रबांधणीचे कार्य सुरू केले. धार्मिक व राजकीय भाषणा करून सर्व लोकांना ब्रिटिश अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रेरणा दिली.
“पुण्याचे मानाचे फक्त पाचच गणपती का?” या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, ही पाच मंडळे आपल्या ऐतिहासिक महत्त्व, सामाजिक प्रभाव, सांस्कृतिक महत्व आणि पारंपरिक पद्धतींमुळे पुण्याच्या नागरिकांच्या मनात विशेष स्थान बनवून घेतले आहेत. हे गणपती मंदिर किंवा मंडळे शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. त्यांचा इतिहास पुण्याच्या इतिहासासोबत गुंतला आहे. उदाहरणार्थ, कसाबा गणपतीची स्थापना शिवाजी महाराजांनी केली होती.
तर हे आहेत पुण्याचे मानाचे पाच गणपती:
- कसाबा गणपती: हा पुण्याचा पहिला मानाचा गणपती आहे. शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांनी या मंदिराची स्थापना केली होती.
- तांबडी जोगेशवरी: हा गणपती तांबडी रंगाच्या कारणाने प्रसिद्ध आहे.
- गुरुजी तालीम: हा गणपती शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याने प्रसिद्ध आहे.
- तुळशीबाग गणपती: हा गणपती तुळशीबाग परिसरात असल्याने प्रसिद्ध आहे.
- केसरीवाडा गणपती: हा गणपती केसरीवाडा परिसरात असल्याने प्रसिद्ध आहे.
पुण्याचे मानाचे गणपतींचे महत्त्व: असे की हे गणपती पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. या गणपतींमुळे समाजात एकता आणि सद्भावना पसरते. हे गणपती धार्मिक भावनांचे केंद्रबिंदू आहेत.
पुणे आणि मुंबई यामधील गणेशोत्सवात खूप फरक आहे. पुण्यामध्ये देखाव्यांवरती भर दिला जातो तर मुंबईतल्या गणपती उत्सवामध्ये बाप्पाची अनेक रुपे उंच मूर्तींमध्ये पाहायला मिळतात. मुंबईमध्ये अगदी छोट्याशा गल्लीमध्ये सुद्धा भव्य दिव्य अशा मूर्तीची स्थापना केली जाते. पुण्यातला गणपती हा जसा सामाजिक उत्सव आहे तसा वैयक्तिक सुद्धा आहे. बहुतांश लोक आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या दिवसांचे गणपती बसवले जातात.

आमच्या घरी सुद्धा श्रींचे आगमन ह्या दिवसांमध्ये होते. आमच्या घरी पूर्ण अकरा दिवसांचा गणपती उत्सव साजरा केला जातो. आम्ही सर्वजण मिळून वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करण्याचा प्रयत्न करतो. देखाव्याने आपल्या कलागुणांना वाव मिळतो. मागच्या वर्षी आमच्या घरी करंजा चा देखावा केला होता. यावर्षी आम्ही देवाचे मंदिर फुलांनी सजवले आहे.
लोकांमध्ये कला व धर्म रुजवणे हे त्या काळाच्या गणेशोत्सवाचे ध्येय होते. पुण्यामध्येच म्हणायचं झालं तर अशी अनेक मंडळे आहेत जी सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मंडळे तर हलता बोलता देखावा एका पटनाट्यच्या रूपाने दाखवतात. काहीजण विविध कलेच्या स्पर्धा घेतात.
आजकल मात्र गणेश उत्सव हे मनोरंजनाचे साधन जास्त झाले आहेत. कर्कश्य आवाजाच्या भिंती, विचित्र असे नाचणे, 48 तास चालणारी मिरवणूक व त्यामुळे होणारी गैरसोय – हे जे आत्ताच स्वरूप मूळ ध्येयाच्या किती अनुरूप आहे? कुठेतरी याचा विचार व्हायला हवा. श्रींची विविध रूपातील मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी ज्या गर्दीचा महापूर लोटत असतो, त्यामध्ये कुठेही काही अनर्थ होऊ नये याची जबाबदारी जितकी श्रींची आहे तितकीच आपल्या पोलीस बांधवांची सुद्धा आहे. आपले कर्तव्य हे पोलीस बांधव 12 ते 14 तास, कटाक्षाने बजवतात. यापेक्षा कोणतीही सेवा श्रींसाठी श्रेष्ठ नसावी. पण ते सुद्धा मनुष्यच आहेत, आणि त्यांना इतका ताण देणे योग्य आहे का? याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. गजानन हे कला विद्या आणि बुद्धिमत्तेच दैवत, मग त्याचे दर्शन घेण्यासाठी त्याच्याच भक्तांना शुल्क आकारण्याचा मूर्खपणा काही मंडळांना कसा सुचतो, याचा विचार कुठे होता तरी व्हायला हवा. गणपती हे शंकर भगवान् यांचे पुत्र, ज्यांनी समुद्रमंथनातून तयार झालेले विष सृष्टीच्या संवर्धनासाठी पिले मग त्यांच्याच मुलाला समुद्रात व नदीमध्ये विसर्जित करून, ह्या सृष्टीमध्ये विष पसरवण्याचे काम आपण कसे करू शकतो, याचा विचार कुठेतरी व्हायला हवा.